- काकडीच्या रोपांची मुळे जमिनीत उथळ असल्यामुळे आलटून पालटून खोल मुळे असलेली मिश्र पिके घेण्याची गरज नसते.
- फळांची प्रत सुधारण्यासाठी आणि उत्पादनात वाढ होण्यासाठी पाच संध्यापर्यंतचे दुय्यम अंकुर छाटून टाकावेत.
- रोपांना टेकू दिल्यामुळे फळे कुसणे थांबवायला मदत होते.
कलिंगडाच्या पिकासाठी जमीन आच्छादनाचे महत्व
- प्लास्टिक मल्चिंग तरबूज की फसल में लगने वाले कीड़ों, बीमारियों और खरपतवारों से बचाती है।
- काले रंग की पॉलिथीन के द्वारा खरपतवारों का नियंत्रण किया जाता है और साथ ही हवा, बारिश व सिंचाई से होने वाले मृदा कटाव को भी यह रोकती है।
- पारदर्शी पॉलीथिन का उपयोग मृदा जनित रोगों और नमी संरक्षण को नियंत्रित करने में किया जाता है।
दोडक्याच्या सुधारित शेतीशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे
- कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह आणि व्हिटॅमिन अ याचा उत्तम स्रोत आहे
- उष्ण आणि दमट हवामानात पिकवले जाते
- तपमान ३२ ते ३८ डिग्री सेंटीग्रेड असावे
- दोडक्याची पेरणी करण्यासाठी निचरा होणारी पद्धत अधिक योग्य समजली जाते.
- उन्हाळ्यात या पिकाला दर पाच सहा दिवसांनी पाणी देणे आवश्यक आहे.
- तोडणीला उशीर केला तर यातले तंतू अत्यंत कडक होतात.
१) शेतकरी त्यांच्या शेतात आरती वाणाच्या (व्ही एन आर बियाणी) दोडक्याची लागवड करून अधिक चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
अनु. | आरती दोडके (व्ही एन आर बियाणी) | |
1. | पेरण्याचा काळ | मार्च |
2. | बियाण्याचे प्रमाण | प्रति एकर एक ते दोन किलो |
3. | दोन ओळीत पेरण्याचे अंतर | १२० ते १५० सेंटीमीटर |
4. | दोन रोपात ठेवण्याचे अंतर | ९० सेंटिमीटर |
5 | पेरणीची खोली | दोन ते तीन सेंटीमीटर |
6. | रंग | आकर्षक हिरवा |
7 | आकार | लांबी २४- २५ सेंटीमीटर रुंदी २.४ इंच |
8 | वजन | २०० ते २२५ ग्राम |
9 | पहिली तोडणी | ५५ दिवस |
भोपळा, कारले, काकडी, कलिंगड इत्यादी पिकांच्या शेतीसाठी कोणते हवामान योग्य आहे?
- वेलवर्गीय भाज्या या उपोष्ण कटिबंधीय हवामानात होतात आणि त्यांची उत्तम वाढ होण्यासाठी आणि अधिक उत्पादन मिळण्यासाठी त्यांना उष्ण आणि दमट हवामानाची गरज असते
- त्यांची चांगली वाढ आणि उत्तम फळधारणा होण्यासाठी रात्र आणि दिवसाचे तापमान अनुक्रमे १८ ते २२ डिग्री सेल्सिअस आणि ३० ते ३५ डिग्री सेल्सिअस असणे योग्य आहे.
- २५ ते ३० डिग्री सेल्सिअस तापमानाला बिया उत्तम प्रकारे आणि वेगाने रुजून येतात.
- योग्य तापमानाला वाढवलेल्या रोपांना मादी फुले आणि फळे जास्त प्रमाणात येतात.
बटाट्याची साले फेकू नका ती तेवढीच महत्त्वाची आहेत!
- बटाट्याच्या सालात पोटॅशियम आढळते त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते.
- बटाटे सालासकट खाल्ल्यामुळे शरीराला धोकादायक अशा अति नील किरणांचा परिणाम कमी होतो.
- बटाट्याच्या सालात भरपूर प्रमाणात पोषक द्रव्य असतात त्यामुळे शरीराची चयापचय क्रिया दुरुस्त होण्यास मदत होते
- बटाट्याची साले आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात कारण त्यात उत्तम प्रमाणात लोह असते त्यामुळे रक्तक्षयाचा धोका कमी होतो.
कांदे आणि लसुण कुजू नयेत यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा
- कांदे आणि लसुण यांच्या दीर्घकालीन साठवणी करिता तापमान आणि सापेक्ष आर्द्रता हे महत्त्वाचे घटक आहेत.
- जुलै ते सप्टेंबर मध्ये आर्द्रता ७० टक्क्यांहून अधिक असल्यामुळे कांदे कुसण्याची शक्यता वाढते.
- तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तपमान कमी झाल्यामुळे कांद्याला मोड येण्याची समस्या वाढते.
- अधिक चांगल्या साठवणी करता कोठाराचे तापमान २५ ते ३० डिग्री सेल्सिअस असावे तर आर्द्रता ६५ ते ७० टक्के असावी.
ग्रामोफोन च्या ग्राम सल्लागाराने शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी पुरस्कार जिंकला आहे.
आज शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी सर्वात जास्त गरज कशाची असेल तर योग्य वेळी योग्य पर्यायांची उपलब्धता. आम्हाला ग्रामोफोन मध्ये शेतकऱ्यांची ही गरज व्यवस्थित समजते. आणि म्हणूनच ग्रामोफोन च्या अविरत प्रयत्नांमुळे तीन लाख पेक्षा जास्त शेतकरी ग्रामोफोनशी जोडले गेले आहेत आणि समृद्धीची नवी कहाणी लिहित आहेत.
शेतकऱ्यांना समृद्ध बनविण्याच्या ग्रामोफोन च्या या उत्कट भावनेला त्यांचे ग्राम सल्लागार खतपाणी घालत आहेत. त्यांना स्थानिक भाषेत “ग्रामोफोन ग्राम सल्लागार” असे म्हणतात. असेच एक उत्कट आवड असणारे आणि कामसू ग्राम सल्लागार आहेत श्री. संजय पाटीदार. त्यांनी जमीन समृद्धी किट वापरून त्यांच्या प्रदेशातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीची सुपीकता वाढवली आहे. शेताची सुपीकता वाढवण्यासाठी ग्रामोफोन कंपनीने जमीन समृद्धी किट आणले आहे. तुम्ही ग्रामोफोनच्या मोबाईल ॲप वरून किंवा टोल फ्री नंबर ला कॉल करून हे किट मागवू शकता.
आमचे ग्राम सल्लागार संजय यांनी शेतकऱ्यांमध्ये जमीन समृद्धी किट चा प्रसार करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या असंख्य मीटिंग घेतल्या आहेत आणि अनेक वेळा त्यांच्या शेतांना भेटी देऊन जमीन समृद्धी किट मुळे शेतीची उत्पादन आणि प्रत यात कशी वाढ आणि सुधारणा होते हे शेतकऱ्यांना समजावून सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांना सुयोग्य फायदा मिळू शकतो.
संजय यांचा निर्धार, अचूक योजना आणि आणि कठोर परिश्रम फळाला आले आणि त्यांनी पहिला “जमीन समृद्धी किट शतक कर्ते” हा किताब मिळवला. संजय पाटीदार हे असे एकमेव उदाहरण म्हणून पुढे आले आहेत की ज्यांनी हे सिद्ध केले आहे की शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे ही जगातील सर्वात जास्त समाधान देणारी गोष्ट आहे. आणि तुम्ही जर हे पूर्ण समर्पण भावनेने आणि कठोर परिश्रम घेऊन केले तर तुम्ही आश्चर्य घडवून आणू शकता.
Shareशेतकऱ्यांसाठी चांगली बातमी – सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवली आहे.
शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सरकारने सहा महिन्यापूर्वी ची कांदा निर्यातीवरील बंदी २६ फेब्रुवारी ला उठवली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याच्या पिकासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल आणि त्यांचा अधिक जास्त फायदा होऊ शकेल. विशेषतः कांद्याच्या रब्बी पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे मोठया प्रमाणात भाव पडण्याची बरीच शक्यता आहे त्यामुळे असे पाऊल उचलणे अत्यंत गरजेचे होते.
भावांमध्ये वेगाने वाढ झाल्यामुळे सरकारने सप्टेंबर २०१९ मध्ये कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती हे लक्षात घेणे आवश्यक आहे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे आणि कांद्याचे भाव स्थिर झाले आहेत. त्याव्यतिरिक्त यावर्षी देशात कांद्याचे च्या उत्पादनात वेगाने वाढ झाली आहे. यामुळे अन्नमंत्री श्री रामविलास पासवान यांनी कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्याची घोषणा केली आहे.
Shareशेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यात बियाणी महत्त्वाची भूमिका बजावतात: केंद्रीय कृषिमंत्री
कोणत्याही पिकाच्या उत्पादनात बियाणे महत्त्वाची भूमिका बजावतात. शेती व शेतकरी कल्याण केंद्रीय मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमार यांनी इंडियन सीड काँग्रेस २०२० मध्ये शेतीमधील बियाण्यांच्या महत्त्वावर भाष्य केले आहे.
त्या कार्यक्रमात त्यांनी म्हटलं की भारत हा कृषीप्रधान देश आहे व देशाची अर्थव्यवस्था दावे व शेती यावर प्रामुख्याने अवलंबून आहे. बियाण्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की “शास्त्रज्ञ व बियाणे उत्पन्न करणारे यांचे संशोधन व योगदान यामुळे भारत अन्नधान्याच्या बाबतीत केवळ स्वयंपूर्णच नव्हे तर गरजेपेक्षा जास्त उत्पादनाचा उच्चांक बनवण्यात यशस्वी झाला आहे.
ग्रमोफोन यांना अधिक चांगल्या शेतीसाठी बियाण्यांचे महत्व माहित आहे आणि म्हणूनच ते सर्वोत्तम बियाणे शेतकऱ्यांच्या घरी पोहचवितात तेही विना वाहतूकशुल्क. शेतकरी ग्रमोफोन एग्रीकल्चर ॲप वरून ‘मार्केट’ विभागातून ही बियाणी मागवू शकतात. ते ग्रामोफॉन चा टोल फ्री नंबर १८०० ३१५– ७५६६ वर मिस कॉल देऊनही ऑर्डर देऊ शकतात.
Share