भोपळा, कारले, काकडी, कलिंगड इत्यादी पिकांच्या शेतीसाठी कोणते हवामान योग्य आहे?

  • वेलवर्गीय भाज्या या उपोष्ण कटिबंधीय हवामानात होतात आणि त्यांची उत्तम वाढ होण्यासाठी आणि अधिक उत्पादन मिळण्यासाठी त्यांना उष्ण आणि दमट हवामानाची गरज असते
  • त्यांची चांगली वाढ आणि उत्तम फळधारणा होण्यासाठी रात्र आणि दिवसाचे तापमान अनुक्रम १८ ते २२ डिग्री सेल्सिअस आणि ३० ते ३५ डिग्री सेल्सिअस असणे योग्य आहे.
  • २५ ते ३० डिग्री सेल्सिअस तापमानाला बिया उत्तम प्रकारे आणि वेगाने रुजून येतात.
  •  योग्य तापमानाला वाढवलेल्या रोपांना मादी फुले आणि फळे जास्त प्रमाणात येतात.
Share

बटाट्याची साले फेकू नका ती तेवढीच महत्त्वाची आहेत!

source- https://www.peakpx.com/604825/potato-peels
  • बटाट्याच्या सालात पोटॅशियम आढळते त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते.
  • बटाटे सालासकट खाल्ल्यामुळे शरीराला धोकादायक अशा अति नील किरणांचा परिणाम कमी होतो.
  • बटाट्याच्या सालात भरपूर प्रमाणात पोषक द्रव्य असतात त्यामुळे शरीराची चयापचय क्रिया दुरुस्त होण्यास मदत होते
  • बटाट्याची साले आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात कारण त्यात उत्तम प्रमाणात लोह असते त्यामुळे रक्तक्षयाचा धोका कमी होतो.
Share

कांदे आणि लसुण कुजू नयेत यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा

  • कांदे आणि लसुण यांच्या दीर्घकालीन साठवणी करिता तापमान आणि सापेक्ष आर्द्रता हे महत्त्वाचे घटक आहेत.
  • जुलै ते सप्टेंबर मध्ये आर्द्रता ७० टक्‍क्‍यांहून अधिक असल्यामुळे कांदे कुसण्याची शक्यता वाढते.
  • तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तपमान कमी झाल्यामुळे कांद्याला मोड येण्याची समस्या वाढते.
  • अधिक चांगल्या साठवणी करता कोठाराचे तापमान २५ ते ३० डिग्री सेल्सिअस असावे तर आर्द्रता ६५ ते ७० टक्के असावी.
Share

ग्रामोफोन च्या ग्राम सल्लागाराने शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी पुरस्कार जिंकला आहे.

आज शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी सर्वात जास्त गरज कशाची असेल तर योग्य वेळी योग्य पर्यायांची उपलब्धता. आम्हाला ग्रामोफोन मध्ये शेतकऱ्यांची ही गरज व्यवस्थित समजते. आणि म्हणूनच ग्रामोफोन च्या अविरत प्रयत्नांमुळे तीन लाख पेक्षा जास्त शेतकरी ग्रामोफोनशी जोडले गेले आहेत आणि समृद्धीची नवी कहाणी लिहित आहेत.

शेतकऱ्यांना समृद्ध बनविण्याच्या ग्रामोफोन च्या या उत्कट भावनेला त्यांचे ग्राम सल्लागार खतपाणी घालत आहेत. त्यांना स्थानिक भाषेत “ग्रामोफोन ग्राम सल्लागार” असे म्हणतात. असेच एक उत्कट आवड असणारे आणि कामसू ग्राम सल्लागार आहेत श्री. संजय पाटीदार. त्यांनी जमीन समृद्धी किट वापरून त्यांच्या प्रदेशातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीची सुपीकता वाढवली आहे. शेताची सुपीकता वाढवण्यासाठी ग्रामोफोन कंपनीने जमीन समृद्धी किट आणले आहे. तुम्ही ग्रामोफोनच्या मोबाईल ॲप वरून किंवा टोल फ्री नंबर ला कॉल करून हे किट मागवू शकता.

आमचे ग्राम सल्लागार संजय यांनी शेतकऱ्यांमध्ये जमीन समृद्धी किट चा प्रसार करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या असंख्य मीटिंग घेतल्या आहेत आणि अनेक वेळा त्यांच्या शेतांना भेटी देऊन जमीन समृद्धी किट मुळे शेतीची उत्पादन आणि प्र यात कशी वाढ आणि सुधारणा होते हे शेतकऱ्यांना समजावून सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांना सुयोग्य फायदा मिळू शकतो.

संजय यांचा निर्धार, अचूक योजना आणि आणि कठोर परिश्रम फळाला आले आणि त्यांनी पहिला “जमीन समृद्धी किट शतक कर्ते” हा किताब मिळवला. संजय पाटीदार हे असे एकमेव उदाहरण म्हणून पुढे आले आहेत की ज्यांनी हे सिद्ध केले आहे की शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे ही जगातील सर्वात जास्त समाधान देणारी गोष्ट आहे. आणि तुम्ही जर हे पूर्ण समर्पण भावनेने आणि कठोर परिश्रम घेऊन केले तर तुम्ही आश्चर्य घडवून आणू शकता.

Share

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी – सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवली आहे.

Gramophone's onion farmer

शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सरकारने सहा महिन्यापूर्वी ची कांदा निर्यातीवरील बंदी २६ फेब्रुवारी ला उठवली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याच्या पिकासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल आणि त्यांचा अधिक जास्त फायदा होऊ शकेल. विशेषतः कांद्याच्या रब्बी पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे मोठया प्रमाणात भाव पडण्याची बरीच शक्यता आहे त्यामुळे असे पाऊल उचलणे अत्यंत गरजेचे होते.

भावांमध्ये वेगाने वाढ झाल्यामुळे सरकारने सप्टेंबर २०१९ मध्ये कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती हे लक्षात घेणे आवश्यक आहे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे आणि कांद्याचे भाव स्थिर झाले आहे. त्याव्यतिरिक्त यावर्षी देशात कांद्याचे च्या उत्पादनात वेगाने वाढ झाली आहे. यामुळे अन्नमंत्री श्री रामविलास पासवान यांनी कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्याची घोषणा केली आहे.

Share

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यात बियाणी महत्त्वाची भूमिका बजावतात: केंद्रीय कृषिमंत्री

कोणत्याही पिकाच्या उत्पादनात बियाणे महत्त्वाची भूमिका बजावतात. शेती व शेतकरी कल्याण केंद्रीय मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमार यांनी इंडियन सीड काँग्रेस २०२० मध्ये शेतीमधील बियाण्यांच्या महत्त्वावर भाष्य केले आहे.

त्या कार्यक्रमात त्यांनी म्हटलं की भारत हा कृषीप्रधान देश आहे व देशाची अर्थव्यवस्था दावे व शेती यावर प्रामुख्याने अवलंबून आहे. बियाण्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना  त्यांनी म्हटले की “शास्त्रज्ञ व बियाणे उत्पन्न करणारे यांचे संशोधन व योगदान यामुळे भारत अन्नधान्याच्या बाबतीत केवळ स्वयंपूर्णच नव्हे तर गरजेपेक्षा जास्त उत्पादनाचा उच्चांक बनवण्यात यशस्वी झाला आहे.

ग्रमोफोन यांना अधिक चांगल्या शेतीसाठी बियाण्यांचे महत्व माहित आहे णि म्हणूनच ते सर्वोत्तम बियाणे शेतकऱ्यांच्या घरी पोहचविता तेही विना वाहतूकशुल्क. शेतकरी ग्रमोफोन एग्रीकल्चर ॲप वरून ‘मार्केट’ विभागातून ही बियाणी मागवू शकतात. ते ग्रामोफॉन चा टोल फ्री नंबर १८०० ३१५७५६६ वर मिस कॉल देऊनही ऑर्डर देऊ शकतात.

Share

गव्हाच्या पिकावर पोटॅशियम युक्त खत फवारण्याचे फायदे 

  • पोटॅशियम पानांची छिद्रे उघड  करण्याचे कार्य नियंत्रित करते त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेत वाढ होण्यास मदत होते.
  • पोटॅशियम रोपांमध्ये प्रथिने आणि पिष्टमय पदार्थ पदार्थ यांचे संश्लेषण घडवून आणण्यास देखील जबाबदार आहे.
  • पोटॅशियम नेहमीच अतिरेकी प्रमाणात होणाऱ्या ओला दुष्काळ सदृश पाणीपुरवठ्याला प्रतिरोध करण्यात चांगली कामगिरी बजावते.
  • पोटॅशियम रोपांमध्ये वाढीशी संबंधित संप्रेरके सक्रिय होण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावते.
  • पोटॅशियम रोपांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते.
Share

चांगली बातमी! आता पंतप्रधान किसान योजनेच्या सर्व लाभार्थीना के सी सी मिळेल.

भारतीय शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. केंद्र सरकारने घोषणा केली आहे की पंतप्रधान किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना आता किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) मिळेल. सरकारने केसीसी कार्ड देण्यासाठी पंधरा दिवसांची मोहीम देखील सुरू केलेली आहे. एका माध्यम वृत्तानुसार चौदा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचे फायदे मिळतील.

केसीसी योजना म्हणजे काय?

किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक कार्ड मिळेल. त्याद्वारे त्यांना तीन लाख रूपये पर्यंतचे कर्ज मिळेल ज्याचा व्याज दर फक्त सात टक्के असेल. शेतकऱ्यांनी दिलेल्या वेळेत पैसे भरल्यास त्यांना अधिक तीन टक्के सू मिळेल. याचा अर्थ शेतकऱ्यांना आता केवळ चार टक्के व्याज किसान क्रेडिट कार्डवर भरावे लागेल.

सरकारने या मोहिमेबद्दल नाबार्डच्या अध्यक्षांना, इतर बँकांच्या अध्यक्षांना, व्यवस्थापकीय संचालकांना तसेच सर्व राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना तपशीलवार सूचना दिलेल्या आहेत. ज्यांच्याकडे केसीसी नाही अशा पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी बनवायला सर्व बँका व राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना सांगितली हे. त्याचप्रमाणे योग्य त्या खात्याद्वारे त्यांना योजनेच्या सर्व लाभार्थ्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिलेला हे.

Share

पंतप्रधान किसान योजना म्हणजे काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत?

पंतप्रधान किसान योजना

पंतप्रधान किसान सन्मान निधी (सर्वसाधारणपणे याला पंतप्रधान किसान योजना म्हटले जाते) ही केंद्र सरकारची एक योजना आहे,  जिचा उद्देश भारतीय शेतकऱ्यांना उत्पन्नाला आधार देणे हा आहे जेणेकरून ते शेतीविषयक विविध आर्थिक गरजा पूर्ण करू शकतील. ही योजना २४ फेब्रुवारी २०१९ ला माननीय पंतप्रधानांनी सुरू केली होती. सुरुवातीला ही योजना केवळ लहाआणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होती, पण आता तिचा विस्तार करून सर्व शेतकरी कुटुंबांना त्यांच्या शेत जमिनीचा आकार विचारात न घेता यात सामील केले आहे.

या योजनेचे फायदे

पंतप्रधान किसन योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबास प्रति वर्ष सहा हजार रुपये दिले जातील. ही रक्कम दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यात प्रत्येक चार महिन्यांनी दिली जाईल.

ही योजना लाखो शेतकऱ्याना फायदेशीर ठरली आहे. एका माध्यम वृत्तानुसार नोव्हेंबर २०१९ पर्यंत .६ कोटी शेतकऱ्यांना याचे फायदे मिळाले आहेत. आता सरकारने या योजनेत अधिक काही वैशिष्ट्ये वाढवली आहेत. या योजने बरोबर इतअनेक जास्तीचे फायदे व सुविधा शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

Share

काकडीसाठी शेत तयार करणे

  • सुरूवातीच्या टप्प्यत शेत चार-पाच वेळा नांगरून ठिसूळ बनवावे आणि शेवटच्या नांगरणी पूर्वी जमिनीमध्ये दर एकरी १०१५ टन शेणखत मिसळावे
  • जर का जमिनीत नेमाटोड कृमी, वाळव्या किंवा लाल मुंगळे यांचा प्रादुर्भाव झाला असेल तर दर एकरी दहा किलो कार्बोफ्युरॉन वापरा
  • शेत जमीन समपातळीत आणल्यावर दोन ते अडीच सेंटीमीटर अंतरावर ६० सेंटिमीटर रुंद सरी बनवा.
  • सरींची लांबी पाण्याचा स्रोत, ऋतू, पाऊस, जमिनीचा उतार यावर अवलंबून असते.
Share