- सी.वीड. (समुद्री शैवाल) वनस्पती चयापचय वाढीसाठी कार्य करते, ही वनस्पतींमध्ये अंतर्गत वाढ आणि विकास प्रक्रियेस उत्तेजन देते.
- प्रारंभिक उगवण वाढीसह प्राथमिक आणि दुय्यम मुळांची वाढ करते.
- सी.वीड. (समुद्री शैवाल) सूक्ष्मजीवांची क्रिया वाढवते. ज्यामुळे मातीची रचना सुधारते.
- यामुळे, वनस्पतींना पोषकद्रव्ये जास्त प्रमाणात मिळतात, ज्यामुळे पाने आणि फांद्यांची वाढ चांगली हाेते.
- पीकांमध्ये फुले आणि फळे यांचे पडणे कमी होते.
- धान्य आणि फळांचा आकार आणि वजन वाढवून पिकांमध्ये जास्त उत्पादन मिळवून गुणवत्ता वाढवते.
ग्रामोफोनच्या सहाय्याने सोयाबीनची लागवड विष्णू ठाकूर यांच्यासाठी फायदेशीर ठरली
इंदाैर जिल्ह्यातील देपालपूर तहसील बिरगोदा खेड्यातील शेतकरी भाई विष्णू ठाकूर हे गेल्या दहा वर्षांपासून शेती करीत असून मुख्यत: सोयाबीन, गहू, हरभरा, लसूण, बटाटे या पिकांची लागवड करतात. विष्णूजी आपल्या पिकांमुळे होणाऱ्या रोगांमुळे शेतीच्या काळात अस्वस्थ झाले होते आणि या कारणास्तव त्यांना त्यांच्या पिकांचे चांगले उत्पादन मिळू शकले नाही.
जेव्हा विष्णूजी आपल्या पिकांशी संबंधित असलेल्या समस्यांमुळे त्रस्त झाले, तेव्हा त्यांना ग्रामोफोनची माहिती मिळाली आणि त्यात ते सामील झाले. ग्रामोफोनशी संपर्क साधल्यानंतर, त्यांंच्या समस्यांचे निराकरण करण्यास सुरवात झाली. याबद्दल बोलताना त्यांनी टीम ग्रामोफोनला सांगितले की, “ग्रामोफोनमध्ये सामील झाल्यानंतर आज माझी पिके सुधारली आहेत. आधी माझी पिके तोट्याचा सौदा किंवा ‘नफा ना तोटा’ असे जे काही होते, ते आता त्याचा नफा देत आहे. विष्णूजींचा असा विश्वास आहे की, ग्रामोफोनमुळे शेती हा एक ‘नफा व्यवसाय’ झाला आहे.
तथापि, ग्रामोफोनने विष्णूजींना त्यांच्या त्रासातून मुक्त केले. परिणामी, त्यांच्या सोयाबीनचे उत्पादन मागील उत्पादनाच्या तुलनेत दुप्पट होते. विष्णूजींना प्रथम सोयाबीन लागवडीपासून 1,95,000 रुपये नफा मिळाला, तरी ग्रामोफोनमध्ये सामील झाल्यानंतर हा नफा 3,80,000 रुपये झाला.
जर तुम्हालाही तुमच्या शेतीसंबंधी काही समस्या येत असतील, तर विष्णूजींप्रमाणे तुम्हीही ग्रामोफोनशी संपर्क साधून आपल्या समस्यांचे निराकरण करू शकता. ग्रामोफोनशी कनेक्ट होण्यासाठी आपण टोल फ्री क्रमांक 1800-315-7566 वर मिस कॉल करू शकता किंवा ग्रामोफोन कृषी मित्र अॅपवर लॉग इन करू शकता.
Shareअम्फानसारखे वादळ अरबी समुद्रावरून येत आहे, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते
पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या अम्फान वादळामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या नुकसानीची बातमी नुकतीच सुरू होती की, केरळच्या नैऋत्येकडील राज्याजवळील अरबी समुद्रात अचानक आणखी एक चक्रीवादळ येणार आहे. पश्चिम राज्यांव्यतिरिक्त या वादळाचा फटका उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागांतही दिसून येणार आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते.
कृषी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका गुजरातला बसू शकतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाने या क्षणी चक्रीवादळाविषयी अद्याप काहीही स्पष्ट केले नाही, परंतु पुढील पाच दिवसांत परिस्थिती सुधारली नाही, तर तीव्र चक्रीवादळ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 30 मे नंतरच या विषयांवर काहीही बोलणे योग्य ठरेल, परंतु लोकांनी जागरुक राहण्याची गरज आहे.
स्रोत: कृषि जागरण
Shareचारोळी औषधी गुणांनी परिपूर्ण आहे
- चारोळी मध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात आढळतात, त्याव्यतिरिक्त, त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 2 देखील पुरेसे असते.
- बी 1, बी 3 चारोळीमध्ये आढळते यामुळे केसांची वाढ हाेते.
- चारोळी एक अतिशय प्रभावी सौंदर्य उत्पादन आहे. याच्या वापरामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि मुरुम साफ होतात. जर चेहऱ्यावर डाग पडला असेल तर तो बारीक करून बाधित भागावर लावा त्याने चेहरा स्वच्छ होतो.
- त्याच वेळी, त्यातून तयार झालेल्या तेलात अमीनो ॲसिडस् आणि स्टीरिक ॲसिड देखील आढळतात.
- चारोळीच्या वापरामुळे पाचन क्रिया मजबूत होते आणि पाचक बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
वांग्याच्या पिकाचे जिवाणूजन्य रोगांपासून कसे संरक्षण करावे
- शेत स्वच्छ ठेवा आणि संक्रमित झाडे गोळा करुन नष्ट करा.
- पीक चक्रात फुलकोबी, कोबी, मोहरी, मुळा या पिकांचा अवलंब केल्यास हा आजार नियंत्रित केला जाऊ शकतो.
- पंतसम्राट वाण या रोगास सहन करते.
- त्याचे रक्षण करण्यासाठी, शेवटच्या नांगरणी किंवा पेरणीच्या वेळी, 1 किलो ट्रायकोडर्मा विरीडी 6-8 टन बारीक कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून एक एकर शेतात पसरवा आणि शेतात ओलावा ठेवा.
- या आजाराच्या प्रतिबंधासाठी, कासुगामायसिन 5% + कॉपर ऑक्सीक्लोराईड 45% डब्ल्यू.पी. 250 ग्रॅम किंवा स्ट्रेप्टोमाइसिन सल्फेट आय.पी. 90% + टेट्रासाइक्लिन हायड्रोक्लोराईड 10% डब्ल्यू / डब्ल्यू 20 ग्रॅम किंवा कासुगामाइसिन 3% एस.एल. 300 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून मुळांजवळ आळवणी करा.
- जैविक पद्धतीने 200 लिटर पाण्यात 1 किलो स्यूडोमोनस फ्लूरोसीन्स प्रति एकर वनस्पतींच्या मुळांजवळ ड्रिंचिंग करा.
टोळ किड्यांच्या मोठ्या हल्ल्यामुळे मध्य प्रदेशच्या कृषिमंत्र्यांनी नुकसानभरपाईची घोषणा केली
राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागांत, पिके घेणारा सर्वात मोठा शत्रू टोळ किड्यांवर हल्ला झाला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, टोळ किड्यांचा इतका मोठा हल्ला, विशेषतः मध्य प्रदेशात 27 वर्षानंतर झाला आहे. हा मोठा हल्ला पाहता सरकारकडून खबरदारीच्या उपाययोजनाही केल्या जात आहेत.
या विषयावर, मध्य प्रदेशचे कृषिमंत्री श्री. कमल पटेल म्हणाले की, टोळ किड्यांच्या प्रादुर्भावामुळे शेतकर्यांना झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण केले जाईल. महसूल विभाग व कृषी विभागातील कर्मचार्यांची संयुक्त टीम तयार करून सर्वेक्षण काम केले जाईल. या सर्वेक्षणात, ज्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांना आर.बी.सी. 6 (4) अंतर्गत नुकसानभरपाई देण्यात येईल. यासह, मंत्री श्री. कमल पटेल म्हणाले की, राज्यस्तरावरून यासाठी आवश्यक त्या सूचनाही लवकरच देण्यात याव्यात.
स्रोत: नई दुनिया
Shareमध्य प्रदेशातील सोयाबीनच्या सुधारित वाणांचे ज्ञान
- एन.आर.सी. -7 (अहिल्या -3): ही मध्यम-मुदतीची वाण आहे. जी सुमारे 90-99 दिवसांत पिकते. एकरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन मिळते. रोपांच्या मर्यादित वाढीमुळे, कापणीच्या वेळी सुविधा असते, तसेच या जातींमध्ये परिपक्व झाल्यानंतर फळे फुटत नाहीत आणि परिणामी उत्पादनात तोटा होत नाही. या जातीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते भुंगे आणि खोड माशीला सहनशील आहे.
- एन.आर.सी. -12 (अहिल्या -2): ही मध्यम-मुदतीची वाण, जी सुमारे 96 ते 99 दिवसांत तयार होते. यात गार्डल भुंगे आणि खोड माशीची सहनशील वैशिष्ट्ये आहेत आणि पिवळ्या मोजेक रोगांवर प्रतिरोधक आहे.
- एन.आर.सी.-37 ((अहिल्या-4): ही वाण 99-105 दिवसांंत तयार केली जाते. त्याची उत्पादन क्षमता एकरी 8-10 क्विंटल आहे.
- एन.आर.सी. -86: ही सुरुवातीची वाण 90 ते 95 दिवसांत पिकते आणि एकरी सुमारे 8 ते 10 क्विंटल उत्पादन होते. ही वाण भुंगे आणि खोड माशीला प्रतिरोधक आहे आणि मूळकूज आणि शेंगांवरील करपा रोगास मध्यम प्रतिरोधक आहे.
- जे.एस. 20-34: एकरी 8 ते 10 क्विंटल उत्पादन मिळते आणि मध्यम-मुदतीची वाण सुमारे 87 दिवसांत पिकविली जाते. मूळकूज आणि पानांवर डाग रोगासाठी प्रतिरोधक आहे. ही वाण कमी आणि मध्यम पावसासाठी उपयुक्त आहे तसेच हलकी ते मध्यम जमिनीसाठी सुध्दा उपयुक्त आहे.
- जे.एस. 20-29: त्याचे उत्पादन सुमारे 10 ते 12 क्विंटल / एकर आहे, जे साधारण 90 ते 95 दिवसांत पिकते. पिवळ्या रंगाचा मोज़ेक एक प्रकारचा विषाणूजन्य रोग आहे आणि मूळकूज साठी प्रतिरोधक आहे.
- जे.एस. 93-05: या प्रकारचे सोयाबीन 90-95 दिवसांत तयार केले जाते. त्याच्या शेंगामध्ये चार दाणे असतात. या जातीची उत्पादन क्षमता अंदाजे 8-10 क्विंटल / एकर आहे.
- जे.एस. 95-60: ही सुरुवातीची वाण 80-85 दिवसांत पिकते, एकरी 8 ते 10 क्विंटल उत्पादन मिळते.हे मध्यम उंचीचे वन आहे याच्या शेंगा सहसा फुटत नाहीत.
शेतकऱ्यांचा नफा वाढेल, खरीप पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ करण्याची तयारी सुरू आहे
कोरोना संकटाच्या वेळी, शेतकर्यांसाठी आणखी एक चांगली बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार, शेतकऱ्यांना अतिरिक्त लाभ देण्यासाठी केंद्र सरकार आता खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याच्या विचारात आहे. असे झाल्यास धान्य, कापूस, डाळी या पिकांचे आधारभूत मूल्य वाढेल.
या संदर्भात कृषी खर्च आणि किंमती आयोगाने (सी.एसी.पी.) आपला अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला आहे. आता हा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल. या शिफारसी मान्य झाल्यास शेतकऱ्यांच्या पिकाला जास्त भाव मिळेल व त्यांचे उत्पन्न वाढेल.
मीडिया रिपोर्टनुसार, सी.एसी.पी.ने 17 खरीप पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ करण्याची शिफारस केली असून, धान्य हे सर्वात प्रमुख आहे. सी.एसी.पी.ने धान्य एम.एस.पी.ला 2.9% ने वाढवून 1888 रुपये प्रतिक्विंटल करण्याची शिफारस केली आहे. माहीत आहे की, सद्यस्थितीत भात एम.एस.पी. प्रति क्विंटल 1815 रुपये आहे.
सी.एसी.पी.ने कापसाचा एम.एस.पी. प्रतिक्विंटल 260 रुपयांनी वाढवण्याची शिफारस केली आहे. तूर, उडीद आणि मूगडाळ यांच्यासह मुख्य डाळींनाही एम.एस.पी. वाढविण्याची शिफारस केली गेली आहे. त्याअंतर्गत तूरडाळ 200 रुपये प्रतिक्विंटल, उडीदडाळ 300 रुपये प्रति क्विंटल, मूगडाळ 146 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली आहे.
स्रोत: कृषि जागरण
Shareवांग्याच्या पिकांमध्ये जिवाणूजन्य मर रोग कसा ओळखावा
- दुपारी, झाडे कोमेजलेली दिसतात आणि ती रात्री निरोगी दिसतात, परंतु झाडे लवकरच मरतात.
- या आजाराची विशिष्ट लक्षणे म्हणजेच वनस्पतींचे कुजणे, वाढ खुंटणे, पाने पिवळसर होणे आणि शेवटी संपूर्ण झाडाचा सुकून मरणे.
- या रोगाचा उद्रेक सहसा फुले किंवा फळांच्या अवस्थेत होतो.
- खालची पाने सुकून जातात आणि कोमेजण्यापूर्वी खाली पडतात.
- मुळांचा रंग आणि देठाचा खालचा भाग गडद तपकिरी होतो.
- कापल्यानंतर खोडामधून पांढरा पिवळसर दुधाळ स्त्राव बाहेर पडतो.
मिरची पिकांमध्ये एफिड (मावा) किडीची ओळख व प्रतिबंध
- मावा लहान कोमल शरीराचे कीटक असतात. जे पिवळे, तपकिरी किंवा काळ्या रंगाचे असू शकतात.
- ते सहसा लहान पाने आणि कोंबांच्या कोप-यात क्लस्टर तयार करून वनस्पतींपासून रस शोषतात आणि चिकट स्त्राव सोडतात, ज्यामुळे बुरशीजन्य रोग होण्याची शक्यता वाढते.
- गंभीर संसर्गामुळे पाने व फांद्या कोरडे किंवा पिवळसर होऊ शकतात.
- मावा कीटक टाळण्यासाठी थायोमेथोक्सोम 25 डब्ल्यू.जी. 100 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8% एस.एल. 80 मिली प्रति 200 एकर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- बवेरिया बेसियाना 250 ग्रॅम प्रति एकर सेंद्रीय पद्धतीने वापरा किंवा वरील कीटकनाशकांसह मिश्रित देखील वापरले जाऊ शकते.