- हे किडे चिकट द्रव स्रवतात ज्यामुळे हानिकारक बुरशी विकसित होते आणि प्रकाश संश्लेषण रोखते.
- या कीटकांतील नवीन किट व प्रौढ मादी या दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात, ते फळांमधून, मोहोर तसेच फांद्यांमधून रस शोषून आंबा पिकाला नुकसान करतात.
- मादी कीटक झाडांच्या मुळांजवळ असलेल्या मातीत अंडी देतात.
- झाडांच्या सभोवती तण नियंत्रण आणि स्वच्छता ठेवली पाहिजे. उन्हाळ्यात बागांना नांगरणी करावी, जेणेकरून या किडीची मादी आणि अंडी, पक्षी आणि तीव्र सूर्यप्रकाशाने नष्ट होतील.
- थियामेथोक्सोम 12.6% + लेम्ब्डा सायहेलोथ्रिन 9.5% झेड.सी. 80 ग्रॅम किंवा 35 ग्रॅम क्लोरोपायरीफास सोबत 75 ग्रॅम वर्टिसिलियम किंवा 75 ग्राम ब्यूवेरिया बेसियाना कीटकनाशक 15 लिटर पाण्यात मिसळून आंब्याच्या फांद्यांवर,मोहोरावर, आंबा फळांवर फवारणी केली जाते.
कपास समृद्धी किटची उत्कृष्ट उत्पादने जाणून घ्या:
ग्रामोफोन “कपास समृद्धी किट” चा वापर आपल्या कापूस पिकांसाठी वरदान ठरेल. या किटमधील सर्वोत्कृष्ट उत्पादनांबद्दल जाणून घ्या.
- एस. के. बायोबिज़: या एन.पी.के.एजोटोबॅक्टर, फॉस्फरस सोलूबलाइज़िंग बॅक्टेरिया आणि पोटॅशियम मोबिलाइज़िंग बॅक्टेरियांचा समावेश असलेल्या बॅक्टेरियांचा एक संघ आहे. ते झाडांना नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम प्रदान करतात.
- ग्रामेक्स: या उत्पादनांमध्ये ह्यूमिक ॲसिड, अमीनो ॲसिड, समुद्री शैवाल आणि मायकोरिझा सारख्या घटकांची संपत्ती आहे.
- कॉम्बैट: या उत्पादनांमध्ये ट्रायकोडर्मा विरिडी आहे. जे मातीत आढळणार्या सर्वात हानिकारक बुरशीपासून बचाव करण्यास सक्षम आहे.
- ताबा-जी: यात झिंक सोल्युबिलीझिंग बॅक्टेरिया असतात, जे झाडाला जस्त/झिंक घटक प्रदान करतात.
मिरची नर्सरीसाठी मातीचे उपचार कसे करावेत?
- 750 ग्रॅम डी.ए.पी.100 ग्रॅम इन्करील (सीवीड, अमिनो ॲसिडस्, ह्यूमिक ॲसिड आणि मायकोरिझा) आणि 250 ग्रॅम ट्रायकोडर्मा विरीडी प्रति चौरस मीटर प्रमाणे 150 किलो शेणखतामध्ये मिसळून नर्सरी मध्ये टाकावे.
- यामुळे मातीची रचना सुधारते तसेच वनस्पतींची चांगली वाढ होते.
- मातीमधील हानिकारक बुरशी आणि रोगांपासून संरक्षण मिळते आणि जैविक उत्पादन असल्यामुळे वनस्पती आणि जमिनीत रसायनांचा दुष्परिणाम होत नाही.
केळीच्या लागवडीची तयारी कशी करावी?
- केळीची चांगली लागवड कल्याने त्यापासून चांगले उत्पादन मिळू शकते.
- केळीच्या लागवडीसाठी 1.5 मीटरच्या अंतरावर 50 X 50 सेमीचा खड्डे बनवा.
- या खड्ड्यांमध्ये १० किलो कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत, १० ग्राम कार्बोफ्यूरान, 50 ग्रॅम फॉस्फरस आणि जमिनीवरील थोडी माती टाका.
- लागवड केलेल्या केळींमध्ये 25 ग्रॅम नायट्रोजन रोपांपासून 50 सें.मी. अंतरावर लावा आणि मातीमध्ये चांगले मिसळा आणि सिंचन करुन घ्या.
मध्य प्रदेशातील सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा होईल, शासन लवकरच निर्णय घेईल
गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक पावले उचलली आहेत. यात अनुक्रमे, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा विमा उतरविला जावा, अशीही चर्चा सरकारने केली आहे. यावर लवकरच सरकार निर्णय घेणार आहे.
या विषयावर माध्यमांशी बोलताना, मध्य प्रदेशचे कृषिमंत्री कमल पटेल म्हणाले की, “पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा मिळेल, राज्य सरकार लवकरच हा निर्णय घेणार आहे.”
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, मध्य प्रदेशात सुमारे 65 लाख शेतकरी आहेत आणि त्यांपैकी 36 लाख शेतकरी आपल्या पिकांचा विमा काढतात. पीक विमा प्रीमियम (हप्ता) 12% आहे, ज्यामध्ये शेतकरी सुमारे 2% रक्कम भरतो आणि उर्वरित रक्कम राज्य आणि केंद्र सरकार एकत्रित करते. सध्याच्या काळात अधिकाधिक शेतकरी या योजनेत सामील झाल्यामुळे हप्त्यामध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे.
स्रोत: आय.ए.एन.एस.
Shareपेरणीपूर्वी जमीन व्यवस्थापनद्वारे कापूस पिकांंचे चांगले उत्पादन घ्या
- कापसाच्या लागवडीची प्रक्रिया सुरू केल्यावर 3-4 वेळा नांगराने खोल नांगरणी करून घ्या जेणेकरून माती ठिसूळ होईल आणि पाणी साठवण्याची क्षमता देखील वाढेल. असे केल्यास जमिनीत हानीकारक कीटक, त्यांचे अंडी, प्यूपा आणि बुरशी देखील नष्ट होते.
- ग्रामोफोन कपास समृद्धी किट ऑफर करीत आहे ज्यामध्ये माती उपचारासाठी बरीच उत्पादने आहेत जी जमीन व्यवस्थापन सुधारतात. या किटमध्ये जिंक सोलूबलाइज़िंग बॅक्टेरिया, सिवीड(समुद्री शेवाळ), अमीनो ॲसिड्स, ह्युमिक ॲसिड, माइकोराइजा, ट्राइकोडर्मा विरिडी आणि एन.पी.के. कन्सोर्टिया बॅक्टेरिया आहेत.
- या कापूस समृद्धी किटचे वजन 8.1 किलो आहे, त्यामध्ये 4 टन चांगले कुजलेले शेण खत मिसळून पेरणीपूर्वी एक एकर शेतात मिसळावे.
- असे केल्याने मातीची संरचना आणि पाणी धारण करण्याची क्षमता सुधारली जाते सोबतच संपुन वाढ आणि पोषण तत्त्वांची वाढ होते, आणि मातीमधील हानिकारक बुरशीपासून संरक्षण होते.
ग्रामोफोनच्या सल्ल्यानुसार शेतकरी रोगमुक्त व प्रगत मिरची पीक घेताे
शेतीसाठी सर्वात महत्वाची गरज म्हणजे माती, म्हणूनच कोणत्याही पिकांकडून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी निरोगी माती अत्यंत महत्वाची असते. खरगोन जिल्ह्यातील गोगावन तहसील अंतर्गत खर्डा गावचे शेतकरी श्री. जीतेंद्र यादव यांनी हो गोष्ट समजून घेतली. मिरची लागवडीपूर्वी जीतेंद्रने आपल्या शेतात ग्रामोफोन माती समृध्दी किट वापरले, ज्याचा त्यांना खूप फायदा झाला.
मध्य प्रदेशातील निमार भागात मिरचीची पिके सहसा जून-जुलैमध्ये सुरू होतात, पण जीतेंद्रने डिसेंबरमध्ये मिरचीची शेती केली, त्या प्रदेशानुसार अनियमित-हंगाम म्हटला जाईल. अशा परिस्थितीत पिकाला रोग होण्याची शक्यता जास्त असते, पण उलट घडले. तथापि, पिकाच्या पेरणीच्या सुमारे 3 महिन्यांनंतर जेव्हा टीम ग्रामोफोन त्यांच्या शेताला भेट द्यायला गेली, तेव्हा जीतेंद्र उत्साही दिसत होते.
जीतेंद्र म्हणाले की, त्यांचे 50 दिवसांचे मिरचीचे पीक रोगमुक्त व निरोगी आहे. यामागील कारण स्पष्ट करण्यासाठी ते खूप उत्सुक झाले. ते म्हणाले की, “माझ्या शेतात पेरणी करण्यापूर्वी मी ग्रामोफोनची माती समृध्दी किट वापरली होती, ज्यामुळे हा रोगमुक्त व निरोगी पिकाचा परिणाम झाला.”
हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, ग्रामोफोनची माती समृध्दी किट वापरल्याने शेताची सुपीकता वाढते आणि पिकाला इतर कोणत्याही बाह्य पोषक पदार्थांची आवश्यकता नसते, म्हणून जीतेंद्रचे पीकही निरोगी होते आणि त्यांना आजारही नव्हता. या वेळी आपल्या पिकाकडून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असल्याचे जीतेंद्र यांनी सांगितले.
जीतेंद्रप्रमाणेच इतर शेतकरीही मिरची लागवडीचा विचार करत असतील, तर ते उन्हाळी मिरची पिकाची लागवड करू शकतात. त्यासाठी लागवड मार्च व एप्रिलमध्ये होते. मिरची लागवड किंवा माती समृध्दी किटशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी 18003157566 या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल द्या.
Shareपीक विमा न करता पिकांच्या नुकसानीची भरपाई होईल, मार्ग कोणता आहे ते जाणून घ्या
कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या पिकांचे नुकसान झाले असेल तर पीक विमा योजनेचा फायदा होतो, पण बर्याच वेळा शेतकरी या योजनेत सामील होत नाहीत म्हणून त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. तथापि, अशा परिस्थितीतही, ज्या बँकेकडून त्यांनी कृषी कर्ज घेतले आहे अशा बँकेची मदत शेतकऱ्यांना मिळू शकते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या वेबसाइटवर या विषयाची माहिती दिली आहे की, या माहितीनुसार पिकांचे 33% पेक्षा जास्त नुकसान झाल्यास ज्या बँकेने कर्ज घेतले आहे, त्यांना तिथून मदत मिळू शकेल.
प्रक्रिया काय आहे?
जर केंद्र आणि राज्य सरकार आपल्या क्षेत्राला नैसर्गिक आपत्ती बाधित क्षेत्र म्हणून घोषित करते आणि आपले पीक 33% किंवा त्याहून अधिक नुकसान झाले असेल तर आपल्याला बँकेत जाऊन आपल्या पिकांच्या नुकसानाची माहिती द्यावी लागेल आणि आपण घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याच्या आपल्या क्षमतेवर परिणाम झाला आहे, हे सांगावे लागेल.
मदत किती मिळेल?
जर आपल्या पिकांमध्ये 33 ते 50% तोटा झाला असेल, तर बँक आपल्या शेती कर्जाची परतफेड करण्यासाठी 2 वर्ष अतिरिक्त कालावधी देईल आणि या दोन वर्षांच्या पहिल्या वर्षासाठी कोणताही हप्ता भरावा लागणार नाही. तर दुसरीकडे, जर पिकांचे 50% पेक्षा जास्त नुकसान झाले तर कर्जाची परतफेड कालावधी 5 वर्षांनी वाढेल आणि पहिल्या वर्षी कोणताही हप्ता भरावा लागणार नाही.
स्रोत: जनसत्ता
Shareमिरचीच्या उत्तम वाणांबद्दल जाणून घ्या
- हायवेग सानिया: मिरची हे वाण जीवाणूजन्य मर रोग आणि मोज़ेक विषाणूं ला प्रतिरोधक आहे आणि त्याची प्रथम तोडणी 50-55 दिवसांत केली जाते. ही वाण जास्त तिखट तसेच चमकदार, हिरवे आणि पिवळसर आहे. त्यांच्या फळांची लांबी 13-15 सेंमी, जाडी 1.7 सेमी आणि वजन सुमारे 14 ग्रॅम आहे.
- मायको नवतेज (एम.एच.सी.पी- 319): ही पांढरी भुरी आणि दुष्काळ सहन करणारी जात आहे. ही संकरित वाण मध्यम ते उच्च तिखट आहे ज्याची लांब साठवण क्षमता आहे. मिरचीची लांबी 8-10 सें.मी. आहे.
- मायको 456: या वाणाची मिरची जास्त तिखट असते आणि फळाची लांबी ८-१० सेंटिमीटर असते.
- हायवेग सोनल: मिरचीची लांबी 14 सेमी असते आणि मध्यम तिखटपणा असतो, जी सुक्या मिरचीसाठी चांगली आहे.
- सिजेंटा एच.पी.एच -12: यात बियाण्यांचे प्रमाण जास्त आहे आणि तिखटपणा जास्त आहे. त्याची झाडे आणि फांद्या मजबूत असून झुडुपासारखी आहेत.
- ननहेम्स US- 1003: फिकट हिरव्या फळांसह मध्यम लांबीची वनस्पती आहे. ज्याचे फळ चांगल्या प्रतीचे आहे.
- ननहेम्स US- 720: गडद हिरवी मिरची आहे. जी मध्यम तिखट आहे.
- ननहेम्स इन्दु: ही वाण मोज़ेक विषाणू आणि रोगास प्रतिरोधक आहे आणि त्यात
चांगली साठवण क्षमता आहे. - स्टारफिल्ड जिनी: ही वाण विषाणूंपासून सहनशील आहे.
- वी.एन.आर चरमी (G-303): ही वाण हलकी हिरवी आहे. मध्यम तिखट आणि मिरचीची लांबी 14 सेमी असून 55-60 दिवसांत त्याची प्रथम तोडणी केली जाते.
- स्टारफिल्ड रोमी- 21: व्हायरस सहनशील आणि अधिक उत्पादन देते. लाल मिरचीसाठी उत्तम प्रकार आहे.
मिरची नर्सरीमध्ये मातीच्या उपचारांचे फायदे जाणून घ्या
- बरेच कीटक आणि मातीमुळे होणार्या रोगांचे घटक मातीत आढळतात, ज्यामुळे विविध प्रकारे पिकांचे नुकसान होते. प्रामुख्याने वाळवी, हुमणी, कटवर्म, नेमाटोड इत्यादी मातींच्या उपचारामुळे नष्ट होऊ शकतात.
- बुरशी / जीवाणूजन्य रोगांचे घटक देखील जमिनीत आढळतात. जे अनुकूल परिस्थितीत रोपांंच्या विविध टप्प्यात संक्रमित होतात आणि पीक उत्पादनास हानी पोहचवतात.
- माती उपचार केल्यामुळे मिरचीच्या वनस्पतीचा संपूर्ण विकास, पौष्टिक वाढ आणि गुणवत्तापूर्ण दर्जेदार उत्पादन प्राप्त होते.
- मातीची रचना सुधारण्याबरोबरच रोग आणि कीटकांचा हल्ला देखील कमी होतो.
- कीटक आणि रोगांच्या संरक्षणानंतर, कृषी संरक्षण रसायने उपचारांद्वारे अधिक वापरली जातात, जास्त खर्चाचा परिणाम म्हणून उत्पादन खर्च वाढतो.