चांगली बातमी! सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी अखेर उठवली

केंद्र सरकारने नुकतीच कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याची अधिसूचना प्रसारित केली आहे. ही घोषणा १५ मार्च २०२० पासून लागू होईल.

कांद्याच्या भावांमध्ये वेगाने वाढ झाल्यामुळे सरकारने भाववाढ नियंत्रित करण्यासाठी २९ सप्टेंबर २०१९ ला कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे आणि कांद्याचे भाव स्थिर झाले आहेत. आणि या हंगामात कांद्याचे उत्पादन अधिक चांगले होईल अशी अपेक्षा आहे. यामुळे सरकारने कांदा निर्यातीवरील गेले ५ महिने लागू असलेली बंदी १५ मार्च पासून उठवण्याची घोषणा केली आहे.

डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) यांनी स्वाक्षरी केलेली ही अधिसूचना असे सांगते की,”सर्व प्रकारच्या कांद्यांची निर्यात आता मुक्तपणे करता येईल आणि त्यासाठी किमान निर्यात किंमत किंवा लेटर ऑफ क्रेडिट यांची आवश्यकता असणार नाही.”

हे पाऊल ग्राहक आणि शेतकरी दोघांनाही फायदेशीर ठरेल, कारण त्यामुळे कांद्याच्या किमती कमी होतील आणि ग्राहकांच्या पाकिटावरील ताण कमी होईल. याशिवाय शेतकऱ्यांना त्यांचे कांदे विकण्यासाठी खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल.

Share

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी – सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवली आहे.

Gramophone's onion farmer

शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सरकारने सहा महिन्यापूर्वी ची कांदा निर्यातीवरील बंदी २६ फेब्रुवारी ला उठवली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याच्या पिकासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल आणि त्यांचा अधिक जास्त फायदा होऊ शकेल. विशेषतः कांद्याच्या रब्बी पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे मोठया प्रमाणात भाव पडण्याची बरीच शक्यता आहे त्यामुळे असे पाऊल उचलणे अत्यंत गरजेचे होते.

भावांमध्ये वेगाने वाढ झाल्यामुळे सरकारने सप्टेंबर २०१९ मध्ये कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती हे लक्षात घेणे आवश्यक आहे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे आणि कांद्याचे भाव स्थिर झाले आहे. त्याव्यतिरिक्त यावर्षी देशात कांद्याचे च्या उत्पादनात वेगाने वाढ झाली आहे. यामुळे अन्नमंत्री श्री रामविलास पासवान यांनी कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्याची घोषणा केली आहे.

Share