आता इजराइल च्या आधुनिक तंत्रज्ञानाने बदलेल भारतातील पारंपारिक शेती

Now India's traditional farms will be improved by Israeli technology

इजराइल कमी पाणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्वोत्कृष्ट शेती करण्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आता इजरायल देखील भारतातील शेतीच्या आधुनिकीकरणास मदत करेल.

या विषयावर बोलताना केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, “1993 पासून भारत आणि इजरायल मधील कृषी क्षेत्रात द्विपक्षीय संबंध आहेत. ही पाचवी भारत-इजरायल कृषी कृती योजना (आयआयएपी) आहे. आतापर्यंत आम्ही यशस्वीरित्या 4 कृती योजना पूर्ण केल्या आहेत. या नवीन कृती योजनेमुळे कृषी क्षेत्रातील शेतकरी समुदायाच्या हितासाठी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणि परस्पर सहकार्य आणखी बळकट होईल. “

ते पुढे म्हणाले की, “इजराइल आधारित कृती योजनांतर्गत स्थापन केलेली ही उत्कृष्टता केंद्रे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. भारत आणि इजराइल दरम्यान तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून फलोत्पादन ची उत्पादकता आणि गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होईल, त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. “

स्रोत: गांव कनेक्शन

स्मार्ट शेतीशी संबंधित अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन आपल्या मित्रांसह देखील शेयर करा.

Share