मान्सूनमध्ये या 4 पिकांची शेती केल्याने होणार मालामाल

पावसाळ्याच्या दिवसांत फळे आणि भाज्यांची शेती करुन चांगला नफा मिळवता येतो. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशा 4 पिकांबद्दल सांगणार आहोत की, ज्याची शेती कमी खर्चात करून तुम्ही चांगली कमाई करु शकता.

सिंघाडा

पावसाळ्याच्या दिवसांत  सिंघाडेची शेती ही खूप चांगली मानली जाते. कारण, या पिकाची शेती पाण्यामध्ये केली जाते. यासाठी सर्वसाधारणपणे छोटे तलाव आणि पाणी असणाऱ्या लहान डबक्यात सिंघाडेच्या बियांची पेरणी केली जाते. मात्र, तलाव किंवा डबके नसल्यास त्यामध्ये खड्डे करून पावसाचे पाणी शेतात भरले जाऊ शकते आणि या खड्ड्यांमध्ये नंतर रोपे लावली जातात. रोपे लावणीनंतर 6 महिन्यांनी पीक विक्रीसाठी तयार होते.

कमल काकडी

कमलाच्या रोपाच्या देठाला कमल काकडी म्हणतात. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्वे आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तलावांमध्येही याची शेती केली जाते. जेव्हा त्याच्या उत्पादनाचा विचार केला जातो तेव्हा, एक एकर या क्षेत्रफळात 50 ते 60 क्विंटल कमल काकडी सहजपणे मिळते.

मशरूम

पावसाळ्याच्या हंगामात मशरूम वेगाने वाढतात. याची शेती करुन शेतकरी चांगले पैसे कमवू शकतात. बाजारातही त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र यांच्या अनेक प्रजाती विषारी असतात म्हणूनच याची पूर्ण माहिती केल्यानंतरच याची योग्य ती प्रजाती निवडा. मशरूमची शेती ही एका छोट्याशा खोलीतही करता येते. फक्त लक्षात ठेवा की त्या खोलीत सूर्यप्रकाश येणे आवश्यक आहे. 

डाळिंब

पावसाळ्याचा हंगाम हा डाळिंब पिकासाठी चांगला मानला जातो. डाळिंबाच्या झाडांवर 120 ते 130 दिवसांत फळे तयार होतात. अशा परिस्थितीत मान्सूनमध्ये डाळिंबाची लागवड केल्यास चांगला नफा मिळू शकतो.

स्रोत: ट्रैक्टर जंक्शन

कृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

Share