सामग्री पर जाएं
-
शेतकरी बंधूंनो, हा आठवडा रब्बी पिकांची काढणी आणि अनेक नवीन पिकांची पेरणी या दोन्ही दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचा आहे.
-
मोहरीच्या 75% शेंगा सोनेरी रंगाच्या झाल्या तर काढणी सुरू करा.
-
हरभरा दाण्यातील ओलावा सुमारे 15 टक्के असेल तेव्हा काढणी प्रक्रिया सुरू करा.
-
गव्हाचे दाणे पिकतात आणि कडक होतात आणि जेव्हा पिकामध्ये ओलावा 20 टक्क्यांपेक्षा कमी असेल तेव्हा काढणी करावी.
-
भात लावणीनंतर 25 ते 30 दिवसांनी तणांचे नियंत्रण करून युरियाचा वापर करावा.
-
ज्या शेतकरीबंधूंना, फक्त एक ते दोन सिंचन सुविधा आहेत, ते रब्बी पीक काढल्यानंतर उन्हाळी मूग किंवा उडीद लागवडीचे नियोजन करू शकतात.
-
उन्हाळ्यामध्ये जनावरांना सहज चारा मिळावा म्हणून यावेळी मका, चवळी आणि चारीच्या काही विशिष्ट जातींची पेरणी करता येते. तर दुसरीकडे, आपण भाज्यांमध्ये भोपळा वर्गीय पिकांची पेरणी करू शकता आणि टोमॅटो, मिरची, वांगी रोपे देखील लावू शकता.
-
टरबूज, खरबूज पिकामध्ये पानांवरती सुरंग किडीची समस्या दिसल्यानंतर अबासीन (एबामेक्टिन 1.9 % ईसी) 150 मिली आणि ट्रेसर (स्पिनोसैड 45% एससी) 60 मिली प्रति एकर दराने फवारणी करावी.
-
जर शेतकरी बंधूंनी, रब्बी पिकाची काढणी केली असेल तर पेंढा हा जाळू नये.
Share