महिला शेतकऱ्यांना मोफत चवळी बियाणे मिळतील, तसेच यासोबत प्रशिक्षण देखील दिले जाईल

संपूर्ण देशभरात खरीप पिकाची तयारी सुरू होणार आहे. शेतकरी बांधव आपल्या क्षेत्रफळानुसार आणि हवामानानुसार शेतात खरीप पिकांची पेरणी करणार. पेरणी करण्यासाठी चांगल्या उत्पादनासाठी उच्च दर्जाचे बियाणे आवश्यक आहे. हाच उद्देश ठेऊन अशा परिस्थितीत राजस्थान सरकारने राज्यातील महिला शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी एक विशेष योजना लागू केली आहे.

राज्य सरकारने महिला शेतकऱ्यांना चवळी बियाणे देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून पिकांचे उत्पादन वाढेल. ‘मुख्यमंत्री कृषक साथी योजना’ अंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्पभूधारक महिला शेतकऱ्यांना चवळीच्या प्रमाणित बियाण्यांची मिनीकिट्स मोफत दिली जाणार आहेत.

योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती-जमाती आणि महिला शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. याशिवाय सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच शेतकऱ्यांना शेतीचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. राज्य सरकारने ही योजना लागू करण्याच्या सूचना देलेल्या आहेत.

स्रोत: किसान समाधान

कृषी क्षेत्रातील अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी दररोज ग्रामोफोनचे लेख वाचत रहा आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Share