आम आदमी विमा योजनेत 100 रुपये जमा करा आणि 75000 रुपयांचा विमा मिळवा

Aam Aadmi Bima Yojana

भारत सरकारकडून गरीब लोकांसाठी सामाजिक सुरक्षा योजना सुरु केल्या जात आहेत. खरं तर, सामान्य लोकांच्या जीवनात समृद्धी आणणे आणि त्याचबरोबर त्या लोकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. तसेच त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हे लक्षात घेऊन आम आदमी विमा योजना सुरु केली आहे.

या योजनेअंतर्गत विमा उतरलेल्या व्यक्तीला अपघाती मृत्यूबरोबरच अपंगत्व देखील समाविष्ट केले जाईल. जर विमाधारक कायमस्वरुपी अपंगत्वाच्या श्रेणीत आले तर, त्यांना 75 हजार रुपये मिळतील. विमाधारकाच्या मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्तीला 30 हजार रुपये आणि त्यांच्या 2 मुलांना 100-100 रुपयांची शिष्यवृत्तीची सुविधा दिली जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विमाधारकाची वयोमर्यादा 18 ते 59 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत वार्षिक प्रीमियम 200 रुपये आहे. त्यापैकी सरकार 100 रुपये जमा करते. विमाधारक जर ग्रामीण भागातील असेल आणि त्यांचा व्यवसाय करणाऱ्या 48 व्यवसायिक गटात समावेश असेल म्हणजेच, बीडी कामगार, सुतार, मत्स्यव्यवसाय, हस्तकला इत्यादीं तर त्यांना 100 रुपये देण्याची गरज नाही.

स्रोत: कृषी जागरण

Share